मुख्य सामग्रीवर वगळा

Enjoy Latest Podcast

अंतिम सत्राची परीक्षा घेण्याच्या निर्णयात राज्यपालांची लुडबुड

अंतिम सत्राची परीक्षा घेण्याच्या निर्णयात राज्यपालांची लुडबुड



करोणामुळे 2020 साल जीवनातून नष्ट झाला आहे. हे वर्ष उगवले हे विसरून जायला हवे इतका वाईट काळ कधी आला नव्हता. सर्वच वाया गेले तेथे शैक्षणिक वर्ष तरी कसे वाचतील ते ही वाया जाताना दिसत आहे. 

त्यात महाराष्ट्राच्या आदरणीय राज्यपालांनी अंतिम वर्षाच्या परीक्षा घ्या असा आग्रह मुख्यमंत्र्यांकडे धरला आहे. 

हा सर्व वाद राज्याचे उच्च शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी घेतलेल्या भूमिकेमुळे झाला आहे. मुळात हा वाद नाही सामंत यांनी आपले मत व्यक्त केले आहे. कोरोणाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे राज्यातील विद्यापीठांना पदवीच्या अंतिम वर्षाच्या शेवटच्या सत्रातील परीक्षा घेणे कठीण होणार आहे.

महाराष्ट्रातील विद्यार्थी संख्या दहा लाखांच्या घरात आहे हे लक्षात घेतले तर सामाजिक अंतर आरोग्यविषयक सुरक्षा वगैरेंचे पालन करून परीक्षा घेणे अवघड होईल आणि ते खरेच आहे.

 देशात जशी आरोग्य आणीबाणी आहे तशी शैक्षणिक आणीबाणी सुद्धा आहे राज्याचे उच्च शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी एक सरळसोट भूमिका घेतली.

विद्यार्थ्यांच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्याचा विचार करून अंतिम वर्षाच्या परीक्षा घेऊ नयेत व विद्यापीठ अनुदान आयोगाच्या सूचनांनुसार ग्रेट प्रदान करणे शक्य आहे काय याबाबत विचारणा केली आहे. अशी विचारणा करणे मत व्यक्त करणे म्हणजे अंतिम निर्णय घेतला असे होत नाही


 मंत्रीमहोदय यांनी परस्पर विद्यापीठ अनुदान आयोगाला पत्र पाठवले व राजभवनात याबाबत अंधारात ठेवले असे राज्यपाल यांचे मत आहे.

राज्यपाल हे कुलपती असतात सर्व विद्यापीठांचे प्रमुख म्हणून काम पाहतात. देशात पूर्व अनेकदा असेही राज्यपाल होऊन गेल की त्यांनी शिक्षणाचा फार संबंध कधी आला नाही पण ते कुलपती म्हणून राजभवनात विराजमान झालेले. 

 ज्ञान व शहाणपण यात फरक आहे असे राज्यपालांना सांगावे लागेल

admin@emtionalhaunt.com

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

परीक्षा रद्द झाल्यामुळे तुम्हाला मिळणाऱ्या गुणांची टक्केवारी

  Emotional Haunt आपल्यासाठी घेऊन आलेले आहे पर्सेंटेज प्रेडिक्टर कॅल्क्युलेटर  परीक्षा रद्द झाल्यामुळे तुम्हाला मिळणाऱ्या गुणांची टक्केवारी जाणून घेण्यासाठी; कॅल्क्युलेटर मध्ये मागील सत्रात तुम्हाला मिळालेले ओव्हरऑल  पर्सेंटेज आणि टर्मवर्क चे पर्सेंटेज टाका क्लिक करा रिझल्ट या बटनावर आणि जाणून घ्या तुम्हाला मिळणारे अँप्रोक्स पर्सेंटेज. ऍक्युरेट रिझल्ट पाहण्यासाठी या सत्राला तुम्हाला मिळू शकणारे एक्सपेक्टटेड टर्मवर्क चे पर्सेंटेज तुम्ही टाकू शकतात. काही शंका असल्यास खाली कमेंट बॉक्समध्ये विचारा Last Year Percentage - Predictor Calculator Previous Semester % = Previous Semester Termwork % = Answer = Thank You! This calculator design by Prof.Kailas Patil, Prof.Harshal Patil Prof.Hemant Chaudhari admin@emotionhaunt.com Follow on Whatsapp Diploma Study Material Click Here to Learn all software free and get E certificate @ just Rs.50/-

अपयशाची ती कहाणी...

बालपणी हुशार आहे असे नाव त्याचे गाजले, दहावी पास होऊनी बारावीत मात्र ढोलताशे वाजले... इंजिनीअरिंगच्या प्रवेशास एक मार्क कमी पडला, तेव्हाचं खरा OBC चा नियम त्याला नडला... अपयश हाती येतां सर्व नाती झालीत उसनी, काय करावं भविष्याचं हीच त्याच्या जीवास कासनी... आशेच्या त्या किरणावर त्यानं डिप्लोमा केला, नाही ठेवला कुणाच्या उपकारांचा ठेला... त्या वर्षात प्राध्यापकही जिव्हाळ्याचे भेटले, तेसुद्धा काही नातेवाईकांच्या डोळ्यात दाटले... हरवण्यासाठी तुजला लाख गनिमी कावे झाले, पण हार कसला मानतो तो कित्येक आले अन् कित्येक गेले... यशाची दोरी हाती येतां साठले सर्व नातेवाईक अन् मित्र, परिस्थितीशी दोन हात केलेल्या महाजनांचा तो सुपुत्र... दिवस जाता जाता बदल हे वेळेने घडवले, साथ सोडुनी गेलेल्या भामट्यांना मी त्याच दिवशी पळवले... बापकमाई वर होता त्याचा पंचक्रोशीत डंका, स्वकमाई येताचं नको वाटे ती सोनियाची लंका... यशाची शिखरं गाठीत जाता लाख नवे संबंध उभारुन आले,  प्रगती बघुनी कित्येक जळाले अन् कित्येक मेले... वेळेच्या त्या दैवताला कोटी करतो मी प्रणाम, ही वेळं बदलली नसती तर नसता मिळाला दाम... या अतुलनीय यशा...

मी असतो जर का भाजी, तर भेंडी झालो असतो

मी  मोर्चा नेला नाही ही संदीप खरे यांची आठ वर्षे जुनी कविता.  हि कविता बुद्धिजीवी माणसाच्या मनातील भाव दर्शवते. बुद्धीजीवी मनुष्य म्हणजे असा मनुष्य की जो त्याचा बुद्धीचा वापर फक्त स्वतःची जीविका चालवण्यासाठी करतो.  अशा  लोकांना समाजात कुठे काय घडत आहे आणी काय नाही याच्याशी काहीही घेणेदेणे नसते. दुर्दैवाने भारतात अशा लोकांची संख्या जास्त आहे. हे तेच लोक आहेत ज्यांना वाटतं शिवाजी जन्मावा पण शेजारच्या घरात. हे लोक मुकाट्याने सगळे सहन करत असतात. कुठल्याही वादविवादात पडत नाही. संघर्ष करून काही गोष्टी मिळवणे यांना माहीतच नसतात. यांची देशभक्ती फक्त 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारीलाच बघायला मिळते. देशात आणीबाणी सदृश्य परिस्थिती असून देखील आजही हे लोक शांतच आणि  शांतच राहतील. चला तर मग बघुया संदीप खरे यांची मी मोर्चा नेला नाही. मी मोर्चा नेला नाही, मी संपही केला नाही मी निषेध सुद्धा साधा, कधी नोंदवलेला नाही भवताली संगर चाले, तो विस्फ़ारुन बघताना कुणी पोटातून चिडताना, कुणी रक्ताळून लढताना मी दगड होउनी थिजलो, रस्त्याच्या बाजूस जेव्हा तो मारायाला देखिल, मज कुणी उचलले नाही नेमस्त झा...