मुख्य सामग्रीवर वगळा

Enjoy Latest Podcast

अपयशाची ती कहाणी...


बालपणी हुशार आहे असे नाव त्याचे गाजले,
दहावी पास होऊनी बारावीत मात्र ढोलताशे वाजले...

इंजिनीअरिंगच्या प्रवेशास एक मार्क कमी पडला,
तेव्हाचं खरा OBC चा नियम त्याला नडला...

अपयश हाती येतां सर्व नाती झालीत उसनी,
काय करावं भविष्याचं हीच त्याच्या जीवास कासनी...

आशेच्या त्या किरणावर त्यानं डिप्लोमा केला,
नाही ठेवला कुणाच्या उपकारांचा ठेला...

त्या वर्षात प्राध्यापकही जिव्हाळ्याचे भेटले,
तेसुद्धा काही नातेवाईकांच्या डोळ्यात दाटले...

हरवण्यासाठी तुजला लाख गनिमी कावे झाले,
पण हार कसला मानतो तो कित्येक आले अन् कित्येक गेले...

यशाची दोरी हाती येतां साठले सर्व नातेवाईक अन् मित्र,
परिस्थितीशी दोन हात केलेल्या महाजनांचा तो सुपुत्र...

दिवस जाता जाता बदल हे वेळेने घडवले,
साथ सोडुनी गेलेल्या भामट्यांना मी त्याच दिवशी पळवले...

बापकमाई वर होता त्याचा पंचक्रोशीत डंका,
स्वकमाई येताचं नको वाटे ती सोनियाची लंका...

यशाची शिखरं गाठीत जाता लाख नवे संबंध उभारुन आले, 
प्रगती बघुनी कित्येक जळाले अन् कित्येक मेले...

वेळेच्या त्या दैवताला कोटी करतो मी प्रणाम,
ही वेळं बदलली नसती तर नसता मिळाला दाम...

या अतुलनीय यशाची शिदोरी खाईल त्या उंच शिखरी,
नको मजला ती खोट्या वशिल्याची भाकरी...

स्वकर्तृत्वाने मिळवलेल्या ओळखीने गाजतो आज परगावी,
आठवतो तो दिवसही जेव्हा हिणवलं होतं त्यांनी मलाच माझ्या गावी...

लेखक :  चि. सुयोग एकनाथ सरोदे. (स्थापत्य अभियंता)



पांगळ प्रेम.....

सहज एका दिवशी Snapchat सुरु केलं,
त्यात तिची request होती,

ना मी तिला ओळखत होतो ना ती मला ओळखत होती,
तरीपण मैत्री करायची इच्छा दोघं बाजुनं होती...

झेराॅक्सच्या नावाखाली तिनं भेट ही काॅलेज रोड ला घडवली,
पण मला वाटलं मीच तिला पटवली...

पुढच्या भेटीसाठी माझ्या वाढदिवसाची पार्टी सबब ठरली,
आता मात्र ती मनातचं उतरली....

मोबाईलच्या नंबरासोबतचं भावनाही दिल्या गेल्या,
नंतर काय सिटी सेंटर, अन् हाॅटेल्स मध्ये भेटीही लाख झाल्या....

दोघांच्या मनांत भावनेचे तार कुठंतरी गुंफत होते,
पण भविष्यात काय होईल हे कुणासही ठाऊक नव्हते....

प्रेमाच्या या भेटीसाठी कितीतरी गनिमी कावे झाले,
कधी नाशकातुन पुणे तर पुण्यातुन नाशिक पंख पसरवावे लागले....

सर्व भविष्याचे नियोजन करुन करुन झाले,
तेवढ्यात मात्र कोरोनाचे आगमन झाले....

माणसांसह नातेही दुरावले,
भुतकाळातले सर्व गैरसमज याच लाॅकडाऊन मध्ये उगवले....

दिवसांसोबत नातेही दुर जात होते,
१७६० ओळखी काढुन बनवलेले नाते दिवसेंदिवस कमकुवत होतं
 होते.....
त्यानं तिच्या करीता सर्व सोडावं,
तिनं मात्र मी घरच्यांचा शब्दाबाहेर नाही असचं म्हणावं.....

शेवटी जीवापाड केलेल्या प्रेमाला तिनं पैशात तोलावं,
अस सर्व वातावरण बघुन त्यानं तरी काय बोलावं....

आयुष्याच्या वाटा चुकलेत असं त्यानेचं म्हणावं,
कोरोनासोबतचं हे पांगळ प्रेमही लाॅकडाऊन मध्येच संपवाव....

लेखन व शब्दरचनाकार :
चि. सुयोग एकनाथ सरोदे. 
      (स्थापत्य अभियंता)




अपेक्षांचं ओझं


काल सहज तिची खुशाली विचारावयास मी तिला काॅल केला,

ती हॅलो म्हणताच बिथरून गेलो कारण रडतांनाची कापरी मला तिच्या आवाजात जाणवत होती,

कारण कुटुंबीयांच्या अपेक्षांचं ओझं घेऊन ती आयुष्याचा प्रवास करत होती,

वाघीणीचं दुध तिच्या पचनी पडत नव्हतं, करीसुद्धा रोज मात्र पोटभर पित होती,

आयुष्य तिचं चार भिंतीत कोंडवुन ती जगत होती,

घरच्यांना सांगूनही घरची मंडळी तिला काडीमात्र जुमानत नव्हती,

थांब सखे अशी खचु नकोस येईल तो सोनियाचा दिवस तुझ्याही आयुष्यात,

ज्या दिवशी हे ओझं तुला हलकं झालेलं असेलं,

तेव्हा गर्वाने थोपटशील पाठ तुझी जेव्हा हे आयुष्यांतर तु मरत मरत का होईना पण कापलेलं असेल,

कधी गरज पडली तर आठवं या दुबळ्याला,

भलेही तुझं ओझं वाहु शकणार नाही पण आयुष्याच्या या शर्यतीत तुला मागे कधी पडु देणार नाही,

फक्त काहीच वर्ष राहीलीत आता,

मग संगच ओझी वाहु या अपेक्षांची,

आनंदाश्रु येतील तेव्हा एवढं सर्व त्यागल्याची,

पण काय सांगु तुला तेव्हा शब्द नसतील याच लोकांना बोलायला,

म्हणुन परत एकदा सांगतो तुला,

माघारी तु कधी फिरु नकोस,

थकली तरी कधी हार मानु नकोस,

पाठीशी नाही सोबतचं आहे मी तुझ्या,

येणार्या संकटांना कधी घाबरु नकोस...

- सुयोग एकनाथ सरोदे

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

तेरी प्रीत को मन तरसे है

तेरी प्रीत को मन तरसे है, अंखिया तरसे दर्शन को। दिन कटता है तेरी राह में, रात तेरी शुधियों में। सूने है यमुना के तीर, समझ भी जा अब मेरी पीर। तेरी याद में अँखिया बरसे, मन सावन को तरसे। वंशीधर, विशधर के स्वामी, आ जाओ गोकुल में। तरस रही गोकुल की गलियां, धुल पॉव को तरसे। होली में सूखी है सखिया, सूखा पचरंग चीर। अंजुरी तरसे तेरी छुअंन को, तन बहो को तरसे। तेरी प्रीत को मन तरसे है, अंखिया तरसे दर्शन को।   -  Dr. Raj Bahadur Singh                       Assistant Professor                NIT, Hamirpur

अंतिम वर्षातील विद्यार्थ्यांची परीक्षा रद्द, ग्रेड नको असलेल्या विद्यार्थ्यांसाठी 'बेस्ट ऑफ टू' चा पर्याय

 राज्यातील करणाचा वाढत असलेला विळखा आणि आगामी पावसाळ्याच्या पार्श्‍वभूमीवर विद्यार्थ्यांची मानसिकता व त्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने राज्यस्तरीय समितीने वर्षातील विद्यार्थ्यांची परीक्षा रद्द करण्याचा निर्णय निश्चित केला आहे.  त्यामुळे आता मागील सत्रातील गुणांच्या सरासरी वरून 50 टक्के तर अंतर्गत मूल्यमापनावरून 50 टक्के गुण देऊन त्यांच्या ग्रेट नुसार मूल्यमापन केले जाणार आहे.  मात्र या विद्यार्थ्यांना ग्रेड मान्य नसेल त्यांना  अपग्रेडेशन साठी संधी दिली जाणार आहे. अपग्रेडेशन ची परीक्षा दिल्यानंतर त्या विद्यार्थ्यांना पूर्वी दिलेल्या ग्रेट पेक्षा अधिक गुण मिळाले, तर ते गुण ग्राह्य धरले जातील अन्यथा पूर्वीच्या ग्रेट  तसाच राहणार आहे.   प्रथम व द्वितीय वर्षातील राज्यातील सुमारे 40 लाख महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची परीक्षा करण्याच्या करोनाच्या प्रादुर्भावामुळे रद्द करण्यात आली आहे. तर विद्यापीठ अनुदान आयोगाच्या मार्गदर्शक  सूचनांनुसार 1 ते 31 जुलैपर्यंत अंतिम वर्षातील सुमारे दहा लाख विद्यार्थ्यांची परीक्षा घेण्याचे नियोजन झाले होते. तत्पूर्वी 1...

तुम रुठे मुझसे जबसे सब रुठा-रुठा लगता है।

तुम रुठे मुझसे जबसे सब रुठा - रुठा लगता है । दुआ इबादत और खुदा सब झूठा - झूठा लगता है । सच लगते थे सब ख्वाब अधेंरी रातों के । और सच य़े है की अब सच भी मुझको झूठा - झूठा लगता है । अजब है य़े बरखा भी अब य़े भी रोज बरसाती है । फिर भी य़े सावन मुझको सूखा - सूखा लगता है । कोयल की बोली भी मुझको करकश लगती है । और वो फूलों की बगियां भी अब सूखी - सूखी सी लगती है । याद है मुझको वो रातें भी जाब चंद सितारे साथ हमारे चलते थे । अब दुनियां चलती है साथ मेरे पर सब रुका - रुका सा लगता है ।                                                   -  Dr. Raj Bahadur Singh                          Assistant Professor                   NIT, Hamirpur ...