मुख्य सामग्रीवर वगळा

Enjoy Latest Podcast

अपयशाची ती कहाणी...


बालपणी हुशार आहे असे नाव त्याचे गाजले,
दहावी पास होऊनी बारावीत मात्र ढोलताशे वाजले...

इंजिनीअरिंगच्या प्रवेशास एक मार्क कमी पडला,
तेव्हाचं खरा OBC चा नियम त्याला नडला...

अपयश हाती येतां सर्व नाती झालीत उसनी,
काय करावं भविष्याचं हीच त्याच्या जीवास कासनी...

आशेच्या त्या किरणावर त्यानं डिप्लोमा केला,
नाही ठेवला कुणाच्या उपकारांचा ठेला...

त्या वर्षात प्राध्यापकही जिव्हाळ्याचे भेटले,
तेसुद्धा काही नातेवाईकांच्या डोळ्यात दाटले...

हरवण्यासाठी तुजला लाख गनिमी कावे झाले,
पण हार कसला मानतो तो कित्येक आले अन् कित्येक गेले...

यशाची दोरी हाती येतां साठले सर्व नातेवाईक अन् मित्र,
परिस्थितीशी दोन हात केलेल्या महाजनांचा तो सुपुत्र...

दिवस जाता जाता बदल हे वेळेने घडवले,
साथ सोडुनी गेलेल्या भामट्यांना मी त्याच दिवशी पळवले...

बापकमाई वर होता त्याचा पंचक्रोशीत डंका,
स्वकमाई येताचं नको वाटे ती सोनियाची लंका...

यशाची शिखरं गाठीत जाता लाख नवे संबंध उभारुन आले, 
प्रगती बघुनी कित्येक जळाले अन् कित्येक मेले...

वेळेच्या त्या दैवताला कोटी करतो मी प्रणाम,
ही वेळं बदलली नसती तर नसता मिळाला दाम...

या अतुलनीय यशाची शिदोरी खाईल त्या उंच शिखरी,
नको मजला ती खोट्या वशिल्याची भाकरी...

स्वकर्तृत्वाने मिळवलेल्या ओळखीने गाजतो आज परगावी,
आठवतो तो दिवसही जेव्हा हिणवलं होतं त्यांनी मलाच माझ्या गावी...

लेखक :  चि. सुयोग एकनाथ सरोदे. (स्थापत्य अभियंता)



पांगळ प्रेम.....

सहज एका दिवशी Snapchat सुरु केलं,
त्यात तिची request होती,

ना मी तिला ओळखत होतो ना ती मला ओळखत होती,
तरीपण मैत्री करायची इच्छा दोघं बाजुनं होती...

झेराॅक्सच्या नावाखाली तिनं भेट ही काॅलेज रोड ला घडवली,
पण मला वाटलं मीच तिला पटवली...

पुढच्या भेटीसाठी माझ्या वाढदिवसाची पार्टी सबब ठरली,
आता मात्र ती मनातचं उतरली....

मोबाईलच्या नंबरासोबतचं भावनाही दिल्या गेल्या,
नंतर काय सिटी सेंटर, अन् हाॅटेल्स मध्ये भेटीही लाख झाल्या....

दोघांच्या मनांत भावनेचे तार कुठंतरी गुंफत होते,
पण भविष्यात काय होईल हे कुणासही ठाऊक नव्हते....

प्रेमाच्या या भेटीसाठी कितीतरी गनिमी कावे झाले,
कधी नाशकातुन पुणे तर पुण्यातुन नाशिक पंख पसरवावे लागले....

सर्व भविष्याचे नियोजन करुन करुन झाले,
तेवढ्यात मात्र कोरोनाचे आगमन झाले....

माणसांसह नातेही दुरावले,
भुतकाळातले सर्व गैरसमज याच लाॅकडाऊन मध्ये उगवले....

दिवसांसोबत नातेही दुर जात होते,
१७६० ओळखी काढुन बनवलेले नाते दिवसेंदिवस कमकुवत होतं
 होते.....
त्यानं तिच्या करीता सर्व सोडावं,
तिनं मात्र मी घरच्यांचा शब्दाबाहेर नाही असचं म्हणावं.....

शेवटी जीवापाड केलेल्या प्रेमाला तिनं पैशात तोलावं,
अस सर्व वातावरण बघुन त्यानं तरी काय बोलावं....

आयुष्याच्या वाटा चुकलेत असं त्यानेचं म्हणावं,
कोरोनासोबतचं हे पांगळ प्रेमही लाॅकडाऊन मध्येच संपवाव....

लेखन व शब्दरचनाकार :
चि. सुयोग एकनाथ सरोदे. 
      (स्थापत्य अभियंता)




अपेक्षांचं ओझं


काल सहज तिची खुशाली विचारावयास मी तिला काॅल केला,

ती हॅलो म्हणताच बिथरून गेलो कारण रडतांनाची कापरी मला तिच्या आवाजात जाणवत होती,

कारण कुटुंबीयांच्या अपेक्षांचं ओझं घेऊन ती आयुष्याचा प्रवास करत होती,

वाघीणीचं दुध तिच्या पचनी पडत नव्हतं, करीसुद्धा रोज मात्र पोटभर पित होती,

आयुष्य तिचं चार भिंतीत कोंडवुन ती जगत होती,

घरच्यांना सांगूनही घरची मंडळी तिला काडीमात्र जुमानत नव्हती,

थांब सखे अशी खचु नकोस येईल तो सोनियाचा दिवस तुझ्याही आयुष्यात,

ज्या दिवशी हे ओझं तुला हलकं झालेलं असेलं,

तेव्हा गर्वाने थोपटशील पाठ तुझी जेव्हा हे आयुष्यांतर तु मरत मरत का होईना पण कापलेलं असेल,

कधी गरज पडली तर आठवं या दुबळ्याला,

भलेही तुझं ओझं वाहु शकणार नाही पण आयुष्याच्या या शर्यतीत तुला मागे कधी पडु देणार नाही,

फक्त काहीच वर्ष राहीलीत आता,

मग संगच ओझी वाहु या अपेक्षांची,

आनंदाश्रु येतील तेव्हा एवढं सर्व त्यागल्याची,

पण काय सांगु तुला तेव्हा शब्द नसतील याच लोकांना बोलायला,

म्हणुन परत एकदा सांगतो तुला,

माघारी तु कधी फिरु नकोस,

थकली तरी कधी हार मानु नकोस,

पाठीशी नाही सोबतचं आहे मी तुझ्या,

येणार्या संकटांना कधी घाबरु नकोस...

- सुयोग एकनाथ सरोदे

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

माणुस जगला किती ?

आजच्या या धावत्या जगात माणसाची जगण्याची क्षमता कमी झालीये. मोजून ५० वर्षे जगला म्हणुन खुप झालं असं म्हणणं हीच काळाची गरज झालीये. पण ही ५० वर्ष तरी माणुस स्वत: साठी जगतो का ?  वय वर्ष ०-५ या कालावधीत बाल अवस्थेत हा जीव अगदी निरागस, स्वच्छंद, मनमोकळा वावरत असतो. त्यात झोप हाच सर्वात महत्वाचा मुद्दा असतो.  ५ वर्षांनंतर तो जीव शालेय जीवनात प्रवेश करतो. मग विद्यालयीन शिक्षण पुर्ण करुन एक पदवी घेऊन या धावत्या जगात स्वत: च अस्तित्व शोधण्यास धावत असतो.  प्रामुख्याने दिवसाचे २४ तास त्यातले ८ तास झोपेत , १ तास त्याची स्वत: ची तयारी, १ तास सकाळ संध्याकाळ जेवण, ६ तासाची शाळा काॅलेज अथवा ८ तासाची नोकरी, रोजचं अपडाऊन १ तास, यातून उरतात फक्त ५ तास, ज्या ५ तासा त हा माणुस कितीसा जगणार ? ५० - ५ = ४५ वर्ष ४५ वर्ष = ३६५ x ४५ = १६४२५ दिवस = ३,९४,२०० तास यातुन माणुस जगतो फक्त ७८,८४० तास ( ३२८५ दिवस ) म्हणजे फक्त ९ वर्ष माणुस स्वत: साठी वेळ काढु शकतो . ५० वर्षाच्या काळात फक्त ९ वर्ष जर माणुस जगतोय तरीपण या वेळेतसुद्धा त्यांचे पालक, नातेवाईक व इतर महत्त्वपूर्ण व्यक्ती अपेक्षांचं ओझं त्यांच्...

परीक्षा रद्द झाल्यामुळे तुम्हाला मिळणाऱ्या गुणांची टक्केवारी

  Emotional Haunt आपल्यासाठी घेऊन आलेले आहे पर्सेंटेज प्रेडिक्टर कॅल्क्युलेटर  परीक्षा रद्द झाल्यामुळे तुम्हाला मिळणाऱ्या गुणांची टक्केवारी जाणून घेण्यासाठी; कॅल्क्युलेटर मध्ये मागील सत्रात तुम्हाला मिळालेले ओव्हरऑल  पर्सेंटेज आणि टर्मवर्क चे पर्सेंटेज टाका क्लिक करा रिझल्ट या बटनावर आणि जाणून घ्या तुम्हाला मिळणारे अँप्रोक्स पर्सेंटेज. ऍक्युरेट रिझल्ट पाहण्यासाठी या सत्राला तुम्हाला मिळू शकणारे एक्सपेक्टटेड टर्मवर्क चे पर्सेंटेज तुम्ही टाकू शकतात. काही शंका असल्यास खाली कमेंट बॉक्समध्ये विचारा Last Year Percentage - Predictor Calculator Previous Semester % = Previous Semester Termwork % = Answer = Thank You! This calculator design by Prof.Kailas Patil, Prof.Harshal Patil Prof.Hemant Chaudhari admin@emotionhaunt.com Follow on Whatsapp Diploma Study Material Click Here to Learn all software free and get E certificate @ just Rs.50/-