मुख्य सामग्रीवर वगळा

Enjoy Latest Podcast

मी असतो जर का भाजी, तर भेंडी झालो असतो

मी  मोर्चा नेला नाही ही संदीप खरे यांची आठ वर्षे जुनी कविता.  हि कविता बुद्धिजीवी माणसाच्या मनातील भाव दर्शवते. बुद्धीजीवी मनुष्य म्हणजे असा मनुष्य की जो त्याचा बुद्धीचा वापर फक्त स्वतःची जीविका चालवण्यासाठी करतो. अशा लोकांना समाजात कुठे काय घडत आहे आणी काय नाही याच्याशी काहीही घेणेदेणे नसते. दुर्दैवाने भारतात अशा लोकांची संख्या जास्त आहे. हे तेच लोक आहेत ज्यांना वाटतं शिवाजी जन्मावा पण शेजारच्या घरात. हे लोक मुकाट्याने सगळे सहन करत असतात. कुठल्याही वादविवादात पडत नाही. संघर्ष करून काही गोष्टी मिळवणे यांना माहीतच नसतात. यांची देशभक्ती फक्त 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारीलाच बघायला मिळते. देशात आणीबाणी सदृश्य परिस्थिती असून देखील आजही हे लोक शांतच आणि  शांतच राहतील. चला तर मग बघुया संदीप खरे यांची मी मोर्चा नेला नाही.



मी मोर्चा नेला नाही, मी संपही केला नाही

मी निषेध सुद्धा साधा, कधी नोंदवलेला नाही


भवताली संगर चाले, तो विस्फ़ारुन बघताना

कुणी पोटातून चिडताना, कुणी रक्ताळून लढताना

मी दगड होउनी थिजलो, रस्त्याच्या बाजूस जेव्हा

तो मारायाला देखिल, मज कुणी उचलले नाही


नेमस्त झाड मी आहे, मूळ फ़ांद्या जिथल्या तेथे

पावसात हिरवा झालो, थंडीत झाडली पाने


पण पोटातून कुठलीही, खजिन्याची ढोली नाही

कुणी शस्त्र लपवले नाही, कधी गरूड बैसला नाही


धुतलेला सातिव सदरा, तुटलेली एकच गुंडी

टकलावर अजून रुळते, अदृश्य लांबशी शेंडी

मी पंतोजींना भ्यालो, मी देवालाही भ्यालो

मी मनात सुद्धा माझ्या, कधी दंगा केला नाही


मज जन्म फ़ळाचा मिळता, मी केळे झालो असतो

मी असतो जर का भाजी, तर भेंडी झालो असतो

मज चिरता चिरता कोणी, रडले वा हसले नाही

मी कांदा झालो नाही, आंबाही झालो नाही


मी मोर्चा नेला नाही, मी संपही केला नाही

मी निषेध सुद्धा साधा, कधी नोंदवलेला नाही



   Follow on Whatsapp    

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

तेरी प्रीत को मन तरसे है

तेरी प्रीत को मन तरसे है, अंखिया तरसे दर्शन को। दिन कटता है तेरी राह में, रात तेरी शुधियों में। सूने है यमुना के तीर, समझ भी जा अब मेरी पीर। तेरी याद में अँखिया बरसे, मन सावन को तरसे। वंशीधर, विशधर के स्वामी, आ जाओ गोकुल में। तरस रही गोकुल की गलियां, धुल पॉव को तरसे। होली में सूखी है सखिया, सूखा पचरंग चीर। अंजुरी तरसे तेरी छुअंन को, तन बहो को तरसे। तेरी प्रीत को मन तरसे है, अंखिया तरसे दर्शन को।   -  Dr. Raj Bahadur Singh                       Assistant Professor                NIT, Hamirpur

अंतिम वर्षातील विद्यार्थ्यांची परीक्षा रद्द, ग्रेड नको असलेल्या विद्यार्थ्यांसाठी 'बेस्ट ऑफ टू' चा पर्याय

 राज्यातील करणाचा वाढत असलेला विळखा आणि आगामी पावसाळ्याच्या पार्श्‍वभूमीवर विद्यार्थ्यांची मानसिकता व त्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने राज्यस्तरीय समितीने वर्षातील विद्यार्थ्यांची परीक्षा रद्द करण्याचा निर्णय निश्चित केला आहे.  त्यामुळे आता मागील सत्रातील गुणांच्या सरासरी वरून 50 टक्के तर अंतर्गत मूल्यमापनावरून 50 टक्के गुण देऊन त्यांच्या ग्रेट नुसार मूल्यमापन केले जाणार आहे.  मात्र या विद्यार्थ्यांना ग्रेड मान्य नसेल त्यांना  अपग्रेडेशन साठी संधी दिली जाणार आहे. अपग्रेडेशन ची परीक्षा दिल्यानंतर त्या विद्यार्थ्यांना पूर्वी दिलेल्या ग्रेट पेक्षा अधिक गुण मिळाले, तर ते गुण ग्राह्य धरले जातील अन्यथा पूर्वीच्या ग्रेट  तसाच राहणार आहे.   प्रथम व द्वितीय वर्षातील राज्यातील सुमारे 40 लाख महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची परीक्षा करण्याच्या करोनाच्या प्रादुर्भावामुळे रद्द करण्यात आली आहे. तर विद्यापीठ अनुदान आयोगाच्या मार्गदर्शक  सूचनांनुसार 1 ते 31 जुलैपर्यंत अंतिम वर्षातील सुमारे दहा लाख विद्यार्थ्यांची परीक्षा घेण्याचे नियोजन झाले होते. तत्पूर्वी 1...

तुम रुठे मुझसे जबसे सब रुठा-रुठा लगता है।

तुम रुठे मुझसे जबसे सब रुठा - रुठा लगता है । दुआ इबादत और खुदा सब झूठा - झूठा लगता है । सच लगते थे सब ख्वाब अधेंरी रातों के । और सच य़े है की अब सच भी मुझको झूठा - झूठा लगता है । अजब है य़े बरखा भी अब य़े भी रोज बरसाती है । फिर भी य़े सावन मुझको सूखा - सूखा लगता है । कोयल की बोली भी मुझको करकश लगती है । और वो फूलों की बगियां भी अब सूखी - सूखी सी लगती है । याद है मुझको वो रातें भी जाब चंद सितारे साथ हमारे चलते थे । अब दुनियां चलती है साथ मेरे पर सब रुका - रुका सा लगता है ।                                                   -  Dr. Raj Bahadur Singh                          Assistant Professor                   NIT, Hamirpur ...