मुख्य सामग्रीवर वगळा

Enjoy Latest Podcast

अंतिम वर्षातील विद्यार्थ्यांची परीक्षा रद्द, ग्रेड नको असलेल्या विद्यार्थ्यांसाठी 'बेस्ट ऑफ टू' चा पर्याय

 राज्यातील करणाचा वाढत असलेला विळखा आणि आगामी पावसाळ्याच्या पार्श्‍वभूमीवर विद्यार्थ्यांची मानसिकता व त्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने राज्यस्तरीय समितीने वर्षातील विद्यार्थ्यांची परीक्षा रद्द करण्याचा निर्णय निश्चित केला आहे. 

त्यामुळे आता मागील सत्रातील गुणांच्या सरासरी वरून 50 टक्के तर अंतर्गत मूल्यमापनावरून 50 टक्के गुण देऊन त्यांच्या ग्रेट नुसार मूल्यमापन केले जाणार आहे.  मात्र या विद्यार्थ्यांना ग्रेड मान्य नसेल त्यांना  अपग्रेडेशन साठी संधी दिली जाणार आहे. अपग्रेडेशन ची परीक्षा दिल्यानंतर त्या विद्यार्थ्यांना पूर्वी दिलेल्या ग्रेट पेक्षा अधिक गुण मिळाले, तर ते गुण ग्राह्य धरले जातील अन्यथा पूर्वीच्या ग्रेट  तसाच राहणार आहे.  

प्रथम व द्वितीय वर्षातील राज्यातील सुमारे 40 लाख महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची परीक्षा करण्याच्या करोनाच्या प्रादुर्भावामुळे रद्द करण्यात आली आहे. तर विद्यापीठ अनुदान आयोगाच्या मार्गदर्शक  सूचनांनुसार 1 ते 31 जुलैपर्यंत अंतिम वर्षातील सुमारे दहा लाख विद्यार्थ्यांची परीक्षा घेण्याचे नियोजन झाले होते. तत्पूर्वी 16 ते 31 मे पर्यंत या विद्यार्थ्यांची प्रात्यक्षिक परीक्षा घेण्याचे नियोजन ठरले होते. मात्र करोनाच्या विळखा वाढू लागल्याने अद्याप प्रात्यक्षिक परीक्षेला सुरुवात झालेली नाही. आता पावसाला सुरुवात  होणार असल्याने गडचिरोली जिल्ह्यातील गोंडवाना व मुंबई विद्यापीठाने परीक्षा घेण्यास अडचण असल्याचे स्पष्ट केले आहे. तर दुसरीकडे मुंबई पुणे सोलापूर औरंगाबाद जळगाव यासह अन्य जिल्ह्यांमध्ये करोनाच्या संसर्ग वाढत आहे. या पार्श्वभूमीवर राज्यातील 13 पैकी 11 विद्यापीठांच्या कुलगुरूंनी परीक्षा घेणे विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने योग्य नसल्याचे सांगितले आहे.

 कुलगुरूंचा हट्टीपणा कशासाठी 

पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ. फडणवीस व पुणे सावित्रीबाई फुले विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन करमळकर यांनी अंतिम वर्षातील विद्यार्थ्यांची परीक्षा घेता येईल असे मत नोंदवले आहे. 

सोमवारी उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी राज्यातील 13 विद्यापीठ विद्यापीठांच्या कुलगुरूंच्या व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे संवाद साधला यावेळी त्यांनी प्रत्येक विद्यापीठाच्या परिसरातील  करोनाची सध्याची स्थिती जाणून घेतली तसेच अंतिम वर्षातील विद्यार्थ्यांच्या परीक्षेबाबत असलेल्या अडचणी जाणून घेतल्या. 

दरम्यान राज्याच्या टॉप टेन यादीमध्ये सोलापूर व पुणे असतानाही या दोन्ही विद्यापीठांच्या कुलगुरूंनी विद्यार्थ्यांच्या परीक्षा घेण्यासाठी काहिहि अडचण नसल्याचे सांगीतले आहे.

आम्ही विद्यार्थी व पालकांच्या अडचणी जाणून घेण्यासाठी सर्वे केला आहे. अंतिम वर्षातील सर्व विद्यार्थ्यांकडे ऑनलाइन ची सुविधा उपलब्ध असून त्यानुसार परीक्षा घेता येईल असे या दोन्ही कुलगुरूंनी बैठकीमध्ये म्हंटल अशी माहिती सूत्रांनी दिली. दुसरीकडे मात्र परिस्थिती वेगळी असतानाही त्यांनी केलेल्या सर्वे बद्दल आश्चर्य व्यक्त होत आहे. तरी राज्यातील कोणत्‍याही विद्यापीठाची परीक्षा काही कारणास्तव रद्द झाल्यास तो निर्णय राज्य भरासाठी लागू असेल असा अहवाल यापूर्वीच समितीने सरकारला दिला आहे.

 त्यामुळे आता अंतिम वर्षातील विद्यार्थ्यांचे परीक्षा रद्द होणार असल्याचे निश्चित झाले आहे. उच्च व तंत्र शिक्षण मंत्री सामंत यांनी राज्यस्तरीय समितीने काही दिवसांत अंतिम अहवाल द्यावा असे निर्देश दिले आहेत. त्यानुसार राज्य स्तरीय समिती आपला अहवाल 31 मे पर्यंत शासनाला देणार आहे

admin@emotionhaunt.com

टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

Ask your question here

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

अपयशाची ती कहाणी...

बालपणी हुशार आहे असे नाव त्याचे गाजले, दहावी पास होऊनी बारावीत मात्र ढोलताशे वाजले... इंजिनीअरिंगच्या प्रवेशास एक मार्क कमी पडला, तेव्हाचं खरा OBC चा नियम त्याला नडला... अपयश हाती येतां सर्व नाती झालीत उसनी, काय करावं भविष्याचं हीच त्याच्या जीवास कासनी... आशेच्या त्या किरणावर त्यानं डिप्लोमा केला, नाही ठेवला कुणाच्या उपकारांचा ठेला... त्या वर्षात प्राध्यापकही जिव्हाळ्याचे भेटले, तेसुद्धा काही नातेवाईकांच्या डोळ्यात दाटले... हरवण्यासाठी तुजला लाख गनिमी कावे झाले, पण हार कसला मानतो तो कित्येक आले अन् कित्येक गेले... यशाची दोरी हाती येतां साठले सर्व नातेवाईक अन् मित्र, परिस्थितीशी दोन हात केलेल्या महाजनांचा तो सुपुत्र... दिवस जाता जाता बदल हे वेळेने घडवले, साथ सोडुनी गेलेल्या भामट्यांना मी त्याच दिवशी पळवले... बापकमाई वर होता त्याचा पंचक्रोशीत डंका, स्वकमाई येताचं नको वाटे ती सोनियाची लंका... यशाची शिखरं गाठीत जाता लाख नवे संबंध उभारुन आले,  प्रगती बघुनी कित्येक जळाले अन् कित्येक मेले... वेळेच्या त्या दैवताला कोटी करतो मी प्रणाम, ही वेळं बदलली नसती तर नसता मिळाला दाम... या अतुलनीय यशा...

माणुस जगला किती ?

आजच्या या धावत्या जगात माणसाची जगण्याची क्षमता कमी झालीये. मोजून ५० वर्षे जगला म्हणुन खुप झालं असं म्हणणं हीच काळाची गरज झालीये. पण ही ५० वर्ष तरी माणुस स्वत: साठी जगतो का ?  वय वर्ष ०-५ या कालावधीत बाल अवस्थेत हा जीव अगदी निरागस, स्वच्छंद, मनमोकळा वावरत असतो. त्यात झोप हाच सर्वात महत्वाचा मुद्दा असतो.  ५ वर्षांनंतर तो जीव शालेय जीवनात प्रवेश करतो. मग विद्यालयीन शिक्षण पुर्ण करुन एक पदवी घेऊन या धावत्या जगात स्वत: च अस्तित्व शोधण्यास धावत असतो.  प्रामुख्याने दिवसाचे २४ तास त्यातले ८ तास झोपेत , १ तास त्याची स्वत: ची तयारी, १ तास सकाळ संध्याकाळ जेवण, ६ तासाची शाळा काॅलेज अथवा ८ तासाची नोकरी, रोजचं अपडाऊन १ तास, यातून उरतात फक्त ५ तास, ज्या ५ तासा त हा माणुस कितीसा जगणार ? ५० - ५ = ४५ वर्ष ४५ वर्ष = ३६५ x ४५ = १६४२५ दिवस = ३,९४,२०० तास यातुन माणुस जगतो फक्त ७८,८४० तास ( ३२८५ दिवस ) म्हणजे फक्त ९ वर्ष माणुस स्वत: साठी वेळ काढु शकतो . ५० वर्षाच्या काळात फक्त ९ वर्ष जर माणुस जगतोय तरीपण या वेळेतसुद्धा त्यांचे पालक, नातेवाईक व इतर महत्त्वपूर्ण व्यक्ती अपेक्षांचं ओझं त्यांच्...

परीक्षा रद्द झाल्यामुळे तुम्हाला मिळणाऱ्या गुणांची टक्केवारी

  Emotional Haunt आपल्यासाठी घेऊन आलेले आहे पर्सेंटेज प्रेडिक्टर कॅल्क्युलेटर  परीक्षा रद्द झाल्यामुळे तुम्हाला मिळणाऱ्या गुणांची टक्केवारी जाणून घेण्यासाठी; कॅल्क्युलेटर मध्ये मागील सत्रात तुम्हाला मिळालेले ओव्हरऑल  पर्सेंटेज आणि टर्मवर्क चे पर्सेंटेज टाका क्लिक करा रिझल्ट या बटनावर आणि जाणून घ्या तुम्हाला मिळणारे अँप्रोक्स पर्सेंटेज. ऍक्युरेट रिझल्ट पाहण्यासाठी या सत्राला तुम्हाला मिळू शकणारे एक्सपेक्टटेड टर्मवर्क चे पर्सेंटेज तुम्ही टाकू शकतात. काही शंका असल्यास खाली कमेंट बॉक्समध्ये विचारा Last Year Percentage - Predictor Calculator Previous Semester % = Previous Semester Termwork % = Answer = Thank You! This calculator design by Prof.Kailas Patil, Prof.Harshal Patil Prof.Hemant Chaudhari admin@emotionhaunt.com Follow on Whatsapp Diploma Study Material Click Here to Learn all software free and get E certificate @ just Rs.50/-