मुख्य सामग्रीवर वगळा

Enjoy Latest Podcast

हीच ती वेळ निकालाची


सदर शासनाने दिलेल्या निकालाच्या वेळा जवळ येताहेत. “मला चांगले मार्क्स मिळावे” हाच विचार ठेऊन तुमचा पाल्य वर्षभर शैक्षणिक चक्कीत भरडला गेलाय. प्रायव्हेट कोचिंग, शाळा आणि सर्वात जास्त कोंडीमारा करणारे ते future career planning चे लेक्चर्स.

या सर्वांचा ताण घेऊन फक्त एकच आशेचा किरण असतो तो म्हणजे निकालाचा क्षण. निकाल जर चांगला लागला तर घरात सर्वत्र आनंदमय वातावरण तयार होतं आणि हाच निकाल मनासारखा नाही लागला तर संपुर्ण वातावरण दु:खमय व हतबल झालेलं दिसते. 


त्यांत नातेवाईकांचे ते तुलनात्मक वाक्य, काळजावर घाव घालणारी ती वागणुक. पण “हीच ती वेळ” जेव्हा तुम्ही तुमची मानसिक स्थिती चांगली ठेऊन मिळालेलं अपयश स्वीकारुन पुढची पाऊलं उचलण्यास तुमच्या पाल्यास सहकार्य करणं गरजेचं असतं. त्याच मनोबल वाढवणं, त्याला भविष्याच एक उज्ज्वल स्वप्न दाखवणं हीच पालकांची त्यावेळेस जबाबदारी असते. 

परंतु काही पालक ती जबाबदारी पार पाडतांना दिसत नाहीत. फक्त काही मोजक्या नातेवाईकांच्या प्रतिक्रिया आल्यानंतर बरेचसे पालक त्यांच्या मुलांना दोष देणं सुरु करतात, रागवतात, चिडतात. हेच जे नातेवाईक असतात ना यांतले कित्येकांनी तर ऐन प्रसंगी मदतीच्या वेळी हात वर केलेले असतात. तरी फक्त माझी मान माझ्या मुलामुळे खाली गेली म्हणुन मी माझ्या मुलावर संताप करेल तर ही पालकाची अतिशय चुकीची भूमिका दिसुन येते.

याउलट जेव्हा ही अवघी दुनिया तुमच्या मुलाच्या निंदेचे छापे बाहेर उमटवत असते, तेव्हा तुम्हीच त्या विद्यार्थ्याला त्याची मानसिक स्थिती टिकवण्याचं सहाय्य करायला हवं.

प्रत्येकाच्या प्रगतीचा एक विशिष्ट काळ असतो. तो व्यक्ती त्याच अनुकुल काळातच त्याची प्रगती करत असतो. आयुष्यात कितीही प्रतिकुल वेळ आली तरी तुमचा वेग कमी न करता मेहनत करावी कारण त्या वेगाने ती प्रतिकुल वेळ सुद्धा निघुन जाईल. 

तसचं अनुकुल वेळेत सुद्धा वेग मात्र सारखाच हवा जेणेकरुन जास्तीत यशाची उंच शिखरं तुम्हाला चढता येतील.

आयुष्यात वेग हवाच, बदलायचा तो फक्त त्या गोष्टीकडे बघायचा दृष्टीकोन. जो तुमचं आयुष्य बदलवेल. 


चि. सुयोग एकनाथ सरोदे.
                  (स्थापत्य अभियंता)



टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

मैं तो हू गोकुल का ग्वाला ।

मैं तो हू गोकुल का ग्वाला । तू है बिलकुल राधा जैसी। मैं सुरज के भोर सा है। तू चंदा की चॉंदी जैसी। मैं इन्द्रधनुष के रंगो सा। तू बरसाने की होली जैसी। मैं तो बगिया का माली हू। तू बगिया के फूलो जैसी। मैं तो झरने सा झारता हू। तू बहती है नदिया जैसी। मैं पथिक सा चलने वाला। तू चलती हिरनी जैसी। मैं तो यहॉं मुशफिर हू। तू है पथिक के साथी जैसी। मैं दरवाजे सा खुलता हू। तू खुलती है खिड़की जैसी। मैं हू मेहनत के हाथों वाला तु है हाथों की रेखा जैसी। मैं तो भँवरे सा उड़ता हू। तू इठलाय़े तितली जैसी। मैं धरती पर रहने वाला। तू है स्वरग अप्सरा जैसी। तू अपने दिल की भी सुनले। जीवन भर साथ निभाऊगां। तू मेरे दिल मे रहती है। तू है मेरी दुनियां जैसी। मैं तो हू गोकुल का ग्वाला । तू है बिलकुल राधा जैसी।                                                               -  Dr. Raj Bahadur Singh...

आजचे आदर्श आणि आपण!!

नुकतीच   महाविद्यालयांमधील   स्नेहसंमेलने   आटोपली , अशाच   एका   कार्यक्रमात आजच्या   तरुणाईचा   अगदी जवळून वेध घेता आला . फॅशन शो   हे मोठं   आकर्षण   असत   अशा कार्यक्रमांमध्ये   आणि मुलांमध्येही   मोठा उत्साह दिसतो . पहिल्याच फेरीत   देखण्या   तरुणांचा    आणि सुंदर ललनांचा झोकात रॅम्प वॉक पार पडला . आता दुसरी फेरी पर्यवेक्षकांच्या प्रश्नोत्तरांची   होती , मुलंही प्रश्नांची समर्पक उत्तरे देत होती , एकाला प्रश्न विचारला कि तुमचे आदर्श कोण ? त्याने क्षणाचाही विलंब न करता उत्तर दिले कि   .... सर हे माझे आदर्श   आहेत मी त्यांची प्रत्येक गोष्ट फॉलो   करतो अगदी   त्यांची वेशभूषा , केशभूषासुद्धा . आता हे संभाषण ऐकणारी मी मात्र   गोंधळात पडले की अरे हे .....   सर कोण , आपण तर त्यांना ओळखत पण नाही   जे आपल्या मुलांचे आदर्श आहेत . घरी गेल्यागेल्या आधी गुगल सर्च   केलं त...

न जाने कितने अनकही बातें हम साथ लेके जायेंगे

न जाने कितने अनकही बातें हम साथ लेके जायेंगे  झूठ कहते है लोग  की खाली हाथ आये थे  खाली  हाथ जाएंगे  दोस्तों अगर हम अपनी जिंदंगी में झांक कर देखे तो पता चले की हम ने आज तक आपनो से कितनी ऎसे बातें कहनी होंगी  जिन का हमने आपनो से जिक्र ही न किया हो।  हर इंसान को यहाँ मालूम हैं की हम खाली हाथ आये थे और खाली हाथ जायेंगे फिर भी वो इंसान जिंदगी भर लगा रहता है दौलत कमाने ने।  आखीर में वही इंसान को जब वास्तवीक  परिस्थिती का अनुभव होता है तब वो उसकी दौलत तो नहीं लेके जा सकता लेकिन ऐसी  बहुत सी अनकही बातें होती है जो उस इंसान के साथ ही चली जाती है। आखिरी समय में वह इंसान मन की बातें तो बताना चाहता है लेकिन तब उसके बस में कुछ नहीं रहता।  या तो जिसको बताना चाहता है वही नहीं रहता या तो वह बात कहने में बहुत देर हो चुकी रहती।  वो अनकही बातें कुछ भी हो सकती है।  जैसे की किसी को बताना हो की आप के लिए वो इंसान कितना जरुरी है।  या फिर आप उसको कितना चाहते हो।...