मुख्य सामग्रीवर वगळा

Enjoy Latest Podcast

हीच ती वेळ निकालाची


सदर शासनाने दिलेल्या निकालाच्या वेळा जवळ येताहेत. “मला चांगले मार्क्स मिळावे” हाच विचार ठेऊन तुमचा पाल्य वर्षभर शैक्षणिक चक्कीत भरडला गेलाय. प्रायव्हेट कोचिंग, शाळा आणि सर्वात जास्त कोंडीमारा करणारे ते future career planning चे लेक्चर्स.

या सर्वांचा ताण घेऊन फक्त एकच आशेचा किरण असतो तो म्हणजे निकालाचा क्षण. निकाल जर चांगला लागला तर घरात सर्वत्र आनंदमय वातावरण तयार होतं आणि हाच निकाल मनासारखा नाही लागला तर संपुर्ण वातावरण दु:खमय व हतबल झालेलं दिसते. 


त्यांत नातेवाईकांचे ते तुलनात्मक वाक्य, काळजावर घाव घालणारी ती वागणुक. पण “हीच ती वेळ” जेव्हा तुम्ही तुमची मानसिक स्थिती चांगली ठेऊन मिळालेलं अपयश स्वीकारुन पुढची पाऊलं उचलण्यास तुमच्या पाल्यास सहकार्य करणं गरजेचं असतं. त्याच मनोबल वाढवणं, त्याला भविष्याच एक उज्ज्वल स्वप्न दाखवणं हीच पालकांची त्यावेळेस जबाबदारी असते. 

परंतु काही पालक ती जबाबदारी पार पाडतांना दिसत नाहीत. फक्त काही मोजक्या नातेवाईकांच्या प्रतिक्रिया आल्यानंतर बरेचसे पालक त्यांच्या मुलांना दोष देणं सुरु करतात, रागवतात, चिडतात. हेच जे नातेवाईक असतात ना यांतले कित्येकांनी तर ऐन प्रसंगी मदतीच्या वेळी हात वर केलेले असतात. तरी फक्त माझी मान माझ्या मुलामुळे खाली गेली म्हणुन मी माझ्या मुलावर संताप करेल तर ही पालकाची अतिशय चुकीची भूमिका दिसुन येते.

याउलट जेव्हा ही अवघी दुनिया तुमच्या मुलाच्या निंदेचे छापे बाहेर उमटवत असते, तेव्हा तुम्हीच त्या विद्यार्थ्याला त्याची मानसिक स्थिती टिकवण्याचं सहाय्य करायला हवं.

प्रत्येकाच्या प्रगतीचा एक विशिष्ट काळ असतो. तो व्यक्ती त्याच अनुकुल काळातच त्याची प्रगती करत असतो. आयुष्यात कितीही प्रतिकुल वेळ आली तरी तुमचा वेग कमी न करता मेहनत करावी कारण त्या वेगाने ती प्रतिकुल वेळ सुद्धा निघुन जाईल. 

तसचं अनुकुल वेळेत सुद्धा वेग मात्र सारखाच हवा जेणेकरुन जास्तीत यशाची उंच शिखरं तुम्हाला चढता येतील.

आयुष्यात वेग हवाच, बदलायचा तो फक्त त्या गोष्टीकडे बघायचा दृष्टीकोन. जो तुमचं आयुष्य बदलवेल. 


चि. सुयोग एकनाथ सरोदे.
                  (स्थापत्य अभियंता)



टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

परीक्षा रद्द झाल्यामुळे तुम्हाला मिळणाऱ्या गुणांची टक्केवारी

  Emotional Haunt आपल्यासाठी घेऊन आलेले आहे पर्सेंटेज प्रेडिक्टर कॅल्क्युलेटर  परीक्षा रद्द झाल्यामुळे तुम्हाला मिळणाऱ्या गुणांची टक्केवारी जाणून घेण्यासाठी; कॅल्क्युलेटर मध्ये मागील सत्रात तुम्हाला मिळालेले ओव्हरऑल  पर्सेंटेज आणि टर्मवर्क चे पर्सेंटेज टाका क्लिक करा रिझल्ट या बटनावर आणि जाणून घ्या तुम्हाला मिळणारे अँप्रोक्स पर्सेंटेज. ऍक्युरेट रिझल्ट पाहण्यासाठी या सत्राला तुम्हाला मिळू शकणारे एक्सपेक्टटेड टर्मवर्क चे पर्सेंटेज तुम्ही टाकू शकतात. काही शंका असल्यास खाली कमेंट बॉक्समध्ये विचारा Last Year Percentage - Predictor Calculator Previous Semester % = Previous Semester Termwork % = Answer = Thank You! This calculator design by Prof.Kailas Patil, Prof.Harshal Patil Prof.Hemant Chaudhari admin@emotionhaunt.com Follow on Whatsapp Diploma Study Material Click Here to Learn all software free and get E certificate @ just Rs.50/-

अपयशाची ती कहाणी...

बालपणी हुशार आहे असे नाव त्याचे गाजले, दहावी पास होऊनी बारावीत मात्र ढोलताशे वाजले... इंजिनीअरिंगच्या प्रवेशास एक मार्क कमी पडला, तेव्हाचं खरा OBC चा नियम त्याला नडला... अपयश हाती येतां सर्व नाती झालीत उसनी, काय करावं भविष्याचं हीच त्याच्या जीवास कासनी... आशेच्या त्या किरणावर त्यानं डिप्लोमा केला, नाही ठेवला कुणाच्या उपकारांचा ठेला... त्या वर्षात प्राध्यापकही जिव्हाळ्याचे भेटले, तेसुद्धा काही नातेवाईकांच्या डोळ्यात दाटले... हरवण्यासाठी तुजला लाख गनिमी कावे झाले, पण हार कसला मानतो तो कित्येक आले अन् कित्येक गेले... यशाची दोरी हाती येतां साठले सर्व नातेवाईक अन् मित्र, परिस्थितीशी दोन हात केलेल्या महाजनांचा तो सुपुत्र... दिवस जाता जाता बदल हे वेळेने घडवले, साथ सोडुनी गेलेल्या भामट्यांना मी त्याच दिवशी पळवले... बापकमाई वर होता त्याचा पंचक्रोशीत डंका, स्वकमाई येताचं नको वाटे ती सोनियाची लंका... यशाची शिखरं गाठीत जाता लाख नवे संबंध उभारुन आले,  प्रगती बघुनी कित्येक जळाले अन् कित्येक मेले... वेळेच्या त्या दैवताला कोटी करतो मी प्रणाम, ही वेळं बदलली नसती तर नसता मिळाला दाम... या अतुलनीय यशा...

मी असतो जर का भाजी, तर भेंडी झालो असतो

मी  मोर्चा नेला नाही ही संदीप खरे यांची आठ वर्षे जुनी कविता.  हि कविता बुद्धिजीवी माणसाच्या मनातील भाव दर्शवते. बुद्धीजीवी मनुष्य म्हणजे असा मनुष्य की जो त्याचा बुद्धीचा वापर फक्त स्वतःची जीविका चालवण्यासाठी करतो.  अशा  लोकांना समाजात कुठे काय घडत आहे आणी काय नाही याच्याशी काहीही घेणेदेणे नसते. दुर्दैवाने भारतात अशा लोकांची संख्या जास्त आहे. हे तेच लोक आहेत ज्यांना वाटतं शिवाजी जन्मावा पण शेजारच्या घरात. हे लोक मुकाट्याने सगळे सहन करत असतात. कुठल्याही वादविवादात पडत नाही. संघर्ष करून काही गोष्टी मिळवणे यांना माहीतच नसतात. यांची देशभक्ती फक्त 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारीलाच बघायला मिळते. देशात आणीबाणी सदृश्य परिस्थिती असून देखील आजही हे लोक शांतच आणि  शांतच राहतील. चला तर मग बघुया संदीप खरे यांची मी मोर्चा नेला नाही. मी मोर्चा नेला नाही, मी संपही केला नाही मी निषेध सुद्धा साधा, कधी नोंदवलेला नाही भवताली संगर चाले, तो विस्फ़ारुन बघताना कुणी पोटातून चिडताना, कुणी रक्ताळून लढताना मी दगड होउनी थिजलो, रस्त्याच्या बाजूस जेव्हा तो मारायाला देखिल, मज कुणी उचलले नाही नेमस्त झा...