मुख्य सामग्रीवर वगळा

Enjoy Latest Podcast

MSBTE Diploma Examinations विद्यार्थ्यांच्या मनातील काही प्रश्न व त्यांची उत्तरे



राज्यात 16 मार्चपासून सर्वत्र विद्यालय महाविद्यालय बंद आहेत. लॉकडाउनला दीड महिन्यापेक्षा जास्त कालावधी उलटून गेला आहे आणि सदर लॉकडाउन 17 मे पर्यंत वाढविण्यात आला आहे. 17 मे नंतर लोकडाऊन संपेल किंवा सुरू राहील अशी कुठलीही नोटिफिकेशन सरकारकडून आलेले नाही. या सर्व कालावधीत विद्यार्थी जास्त संभ्रमात आहेत. दरम्यान MSBTE चे दोन सरकूलर आले पण ते सरकूलर विद्यार्थ्यांच्या मनातील शंकांचे निरक्षण नाही करू शकले. पेपरात येणारे लेख व युट्युब मध्ये दाखवले जाणारे व्हिडिओ विद्यार्थ्यांच्या संभ्रमात अधिक भर पाडत आहेत. तरी अशा विद्यार्थ्यांच्या अनेक शंका-कुशंका दूर करण्यासाठी इमोशनल हँट च्या टीमने विविध संस्थांच्या अनुभवी प्राचार्य विभाग प्रमुख यांच्याशी चर्चा करून भविष्यातील संभाव्य परिस्थितीचा वेध घेण्याचा प्रयत्न केला आहे.

खाली आपण जाणून घ्या विद्यार्थ्यांच्या मनातील काही प्रमुख प्रश्न त्यांची उत्तरे

परीक्षा केव्हा होईल

युजीसी च्या गाईडलाईन नुसार जुलै महिन्यात परीक्षा घेण्याचे सूचना देण्यात आल्या आहेत. त्यामुळे जर सर्वत्र लोकडाऊन नसेल तर परीक्षा जुलै महिन्यात होऊ शकते.

परीक्षा कशा पद्धतीने होणार ऑनलाईन किंवा ऑफलाईन

MSBTE च्या कार्यक्षेत्रात संपूर्ण महाराष्ट्र असल्यामुळे महाराष्ट्रातील संपूर्ण जिल्ह्याची परिस्थिती लक्षात घेऊनच निर्णय घ्यावा लागेल. तसेच ऑनलाईन एक्झाम साठी लागणारे आयटी इन्फ्रास्ट्रक्चर प्रत्येक संस्थेत उपलब्ध होणे शक्य होत नसल्याने डिप्लोमा ची एक्झाम ऑनलाईन होण्याची शक्यता कमीच आहे. त्यामुळे एक्झाम ऑफलाईन पद्धतीने होण्याची शक्यता जास्त आहे.

सबमिशन क्लास टेस्ट चे काय होईल

I scheme मध्ये तीस मार्क पैकी 20 मार्क क्लास टेस्ट चे तर दहा मार्क मायक्रो प्रोजेक्ट साठी असतात आणि टर्मवर्कला सेपरेट मार्क्स असतात त्यामुळे सबमिशन होण्याची शक्यता क्लास टेस्ट होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

क्लास टेस्ट घेण्या ऐवजी फक्त क्लास टेस्ट चे मार्क्स कन्सिडर करण्याचा पर्याय या ठिकाणी उपलब्ध आहे पण याबाबत MSBTE काय निर्णय घेते याचे भाकीत करणे कठीण आहे.

फर्स्ट इयर सेकंड इयर ची परीक्षा कॅन्सल होईल का

असे
होण्याची शक्यता कमीच राहील कारण अनेक तृतीय वर्षाचे विद्यार्थ्यांचे दुतीय वर्षाचे सब्जेक्ट बॅकलोग राहिल्यामुळे परीक्षा घ्यावीच लागेल. तरी परीक्षा कॅन्सल चा निर्णय  झाल्यास पुढच्या वर्षी हे सब्जेक्ट क्लिअर करावे लागतील म्हणून परीक्षा ह्याच वर्षी होणे विद्यार्थ्यांच्या सोयीचे असेल.

डिप्लोमा टू डिग्री ऍडमिशन सेकंड - थर्ड इयर च्या विद्यार्थ्यांची ऍडमिशन केव्हा सुरू होणार

HRD च्या सरकूलर नुसार नवीन ऍडमिशन ह्या सप्टेंबर महिन्यात होतील तर जुन्या (रेगुलर) ऍडमिशन ऑगस्ट महिन्यात घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.


admin@emotionalhaunt.com

कमेंट बॉक्स मध्ये आपणही आपले प्रश्न विचारू शकतात

टिप्पण्या

  1. Sir जर 2nd year ला collage change करायचे असल्यास,result तर लागेलच !
    जर जुलै मध्ये परिक्षा होतील तर निकाल कधी लागेल ?

    उत्तर द्याहटवा
  2. Sir but amhi red zone madhe ahot tr amhi paper denyasathi kase jau shaku

    उत्तर द्याहटवा
    प्रत्युत्तरे
    1. MSBTE च्या कार्यक्षेत्रात संपूर्ण महाराष्ट्र असल्यामुळे महाराष्ट्रातील संपूर्ण जिल्ह्याची परिस्थिती लक्षात घेऊनच निर्णय घ्यावा लागेल.

      हटवा

टिप्पणी पोस्ट करा

Ask your question here

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

परीक्षा रद्द झाल्यामुळे तुम्हाला मिळणाऱ्या गुणांची टक्केवारी

  Emotional Haunt आपल्यासाठी घेऊन आलेले आहे पर्सेंटेज प्रेडिक्टर कॅल्क्युलेटर  परीक्षा रद्द झाल्यामुळे तुम्हाला मिळणाऱ्या गुणांची टक्केवारी जाणून घेण्यासाठी; कॅल्क्युलेटर मध्ये मागील सत्रात तुम्हाला मिळालेले ओव्हरऑल  पर्सेंटेज आणि टर्मवर्क चे पर्सेंटेज टाका क्लिक करा रिझल्ट या बटनावर आणि जाणून घ्या तुम्हाला मिळणारे अँप्रोक्स पर्सेंटेज. ऍक्युरेट रिझल्ट पाहण्यासाठी या सत्राला तुम्हाला मिळू शकणारे एक्सपेक्टटेड टर्मवर्क चे पर्सेंटेज तुम्ही टाकू शकतात. काही शंका असल्यास खाली कमेंट बॉक्समध्ये विचारा Last Year Percentage - Predictor Calculator Previous Semester % = Previous Semester Termwork % = Answer = Thank You! This calculator design by Prof.Kailas Patil, Prof.Harshal Patil Prof.Hemant Chaudhari admin@emotionhaunt.com Follow on Whatsapp Diploma Study Material Click Here to Learn all software free and get E certificate @ just Rs.50/-

अपयशाची ती कहाणी...

बालपणी हुशार आहे असे नाव त्याचे गाजले, दहावी पास होऊनी बारावीत मात्र ढोलताशे वाजले... इंजिनीअरिंगच्या प्रवेशास एक मार्क कमी पडला, तेव्हाचं खरा OBC चा नियम त्याला नडला... अपयश हाती येतां सर्व नाती झालीत उसनी, काय करावं भविष्याचं हीच त्याच्या जीवास कासनी... आशेच्या त्या किरणावर त्यानं डिप्लोमा केला, नाही ठेवला कुणाच्या उपकारांचा ठेला... त्या वर्षात प्राध्यापकही जिव्हाळ्याचे भेटले, तेसुद्धा काही नातेवाईकांच्या डोळ्यात दाटले... हरवण्यासाठी तुजला लाख गनिमी कावे झाले, पण हार कसला मानतो तो कित्येक आले अन् कित्येक गेले... यशाची दोरी हाती येतां साठले सर्व नातेवाईक अन् मित्र, परिस्थितीशी दोन हात केलेल्या महाजनांचा तो सुपुत्र... दिवस जाता जाता बदल हे वेळेने घडवले, साथ सोडुनी गेलेल्या भामट्यांना मी त्याच दिवशी पळवले... बापकमाई वर होता त्याचा पंचक्रोशीत डंका, स्वकमाई येताचं नको वाटे ती सोनियाची लंका... यशाची शिखरं गाठीत जाता लाख नवे संबंध उभारुन आले,  प्रगती बघुनी कित्येक जळाले अन् कित्येक मेले... वेळेच्या त्या दैवताला कोटी करतो मी प्रणाम, ही वेळं बदलली नसती तर नसता मिळाला दाम... या अतुलनीय यशा...

मी असतो जर का भाजी, तर भेंडी झालो असतो

मी  मोर्चा नेला नाही ही संदीप खरे यांची आठ वर्षे जुनी कविता.  हि कविता बुद्धिजीवी माणसाच्या मनातील भाव दर्शवते. बुद्धीजीवी मनुष्य म्हणजे असा मनुष्य की जो त्याचा बुद्धीचा वापर फक्त स्वतःची जीविका चालवण्यासाठी करतो.  अशा  लोकांना समाजात कुठे काय घडत आहे आणी काय नाही याच्याशी काहीही घेणेदेणे नसते. दुर्दैवाने भारतात अशा लोकांची संख्या जास्त आहे. हे तेच लोक आहेत ज्यांना वाटतं शिवाजी जन्मावा पण शेजारच्या घरात. हे लोक मुकाट्याने सगळे सहन करत असतात. कुठल्याही वादविवादात पडत नाही. संघर्ष करून काही गोष्टी मिळवणे यांना माहीतच नसतात. यांची देशभक्ती फक्त 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारीलाच बघायला मिळते. देशात आणीबाणी सदृश्य परिस्थिती असून देखील आजही हे लोक शांतच आणि  शांतच राहतील. चला तर मग बघुया संदीप खरे यांची मी मोर्चा नेला नाही. मी मोर्चा नेला नाही, मी संपही केला नाही मी निषेध सुद्धा साधा, कधी नोंदवलेला नाही भवताली संगर चाले, तो विस्फ़ारुन बघताना कुणी पोटातून चिडताना, कुणी रक्ताळून लढताना मी दगड होउनी थिजलो, रस्त्याच्या बाजूस जेव्हा तो मारायाला देखिल, मज कुणी उचलले नाही नेमस्त झा...